मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हॅपी फ्रेंडशिप डे....

आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो; तो मित्र असतो. आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात.

नागपंचमी विशेष......

सर श्रावणाची सांगे, गोड गुपित कानांत । झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत ।                  ह्या ओळी ऐकल्या, की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमी साठी झाडावर बांधलेले झोके आठवतात. झोक्यांवर झुलणार्या मुली आठवतात. दारीफेर धरून चाललेली नागपंचमी गाणी आठवतात. “चल ग सखे वारूळाला - नागोबाला पुजायला…” या ओळी ओठावर येतात. खरं ना? बरोबरच आहे. कारण श्रावण महिन्यातला हा पहिला सण नागपंचमी. सर्व स्त्रिया, मुली ह्यांना अगदी हा हवासा वाटणारा सण. सर्वच मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया नागदेवतेची मनापासून भक्तीभावाने पूजा करतात त्या नागाला दूध पाजतात. शेतकरी ह्या दिवशी शेत नांगरत नाही.  स्त्रिया भाजी चिरत नाहीत, तवा ठेवत नाहीत. नागपंचमीचा सण हा त्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. ह्या सणाला देवापुढे पाटावर गंधाने नाग नागोबा-नागीण तिची पिल्ले काढतात. त्याची पूजा करतात. नागस्तोत्र म्हणतात. दूध, लाह्या ह्यांचा नैवेद्य दाखवतात आणि पूजा करून प्रार्थना करतात की हे नागराजा! आमचे संरक्षण कर, कृपा कर.   ...

लेख क्रमांक .4 वनसंवर्धन दीन विशेष.....

                                                       “मुलांनो हे जे १०० मजली सायन्स सेंटर तुम्ही पहात आहात हा विज्ञानाचा आणि मानवाने बनवलेल्या असंख्य अजब यंत्रांचा एक नमुना आहे. काही वर्षांपुर्वी ह्या ठिकाणी उंचच उंच जंगल आणि खडकाळ टेकड्या होत्या”, गुरुजी आम्हाला सांगत होते. एका दृष्टीने हा खरचं एक करिष्मा होता पण त्यासाठी आपण काय गमावलं आहे ह्याची जाणीव कित्ती लोकांना आहे? ही जंगी इमारत उभारण्यासाठी कित्तेक झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली. उंचच उंच टेकड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. इमारतीचा पाया घट्ट करण्यासाठी जमीनीच्या आतपर्यंत खोदकाम करुन आपण लोखंडी बार उभारले. आणि हे असे प्रकार ह्या एकाच ठिकाणी नाहीत तर जगभर चालु आहेत. कित्ती मोठ्ठ्या प्रमाणात मनुष्याने निसर्गावर अतिक्रमण केले आहे.                                               ...

व्यसन : मोबाईल एक समस्या....

                                                                        आजच्या काळात सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. घराघरातील प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल पहावयास मिळत आहे. त्यातही विलक्षण अशी विविधता आलेली आहे. घरातल्या फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली आहे. अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधी-कधी मोबाईल नकोस वाटू लागतो. त्यातूनच प्रश्न निर्माण होतो – ‘ मोबाईल शाप कि वरदान?’                                         पण, ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते तेव्हा ती मानवी सुखसोयी या दृष्टीनेच उदयास येते. मानवाचे कल्याण साधणे हाच एकमेव हेतू या तंत्रज्ञानामागे अ...

लेख क्र.3 शेतकरी राजा

                 "शेतकरी" एक अशी व्यक्ती जी आपल्या कष्टाने,मेहनतीने आपल्या शेतात राबते. वेगवेगळ्या हंगामा मध्ये वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पादन मिळवते आणि बाजारपेठेत नेऊन व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला विकते, अशी व्यक्ती म्हणजे शेतकरी.                                                                            शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज [आदिमानव] यांच्या विचारातून व युक्ती तुन या संकपलनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यांसाठी [बळीराजा] प्रार्थना केली जायची, 'इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो' असा आवाज घराघरातून ऐकू यायचा.                  शेतकऱ्यांला शेती कर...

मातृ सुरक्षा दिन विशेष....

                               B || आई || आई म्हणजे असते एक माये चा पाझर आई ची माया असते एक आनंदाचा सागर आई म्हणजे असतो एक घराचा आधार आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार आई च्या एक हाकेत ते घर सारं मावतं मन-आधारा च्या पोटी सारयांना आई च घर दावतं आई च्या हाताला असते चव लई भारी आई चा हाताने खाण्याची बातच हो न्यारी आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल आई चा राग म्हणजे बेभान ढगांचा गडगडाट अवघड असते खुप तेव्हा सापडणे आपली वाट सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर वेदना नाहिशी करते आई ...

My thought...

माणसाचं मनच मोठं विचित्र... त्याला एकटेपणा नकोसा असतो. पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची, तो स्वतः एकांताच्या शोधात निघतो...

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ....

            ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला , जगायला शिकवलं , अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे ! गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना , आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन …!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

बैलपोळा

बैलपोळा च्या शुभेच्छा!!!! संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' या सणाला "बैलपोळा" असेही म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर् ‍ यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर् ‍ याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर् ‍ हेने सजविण्यात येते. शेतकर् ‍ याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चु...