मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दीन. Marathi Bhasha din .

अलीकडील पोस्ट

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

महात्मा जोतिबा फुले पुण्यदीन..

                                            क्रांतिसूर्य महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले.  समाजसेवेला आपले पूर्ण जीवन वाहून घेतलेले दाम्पत्य म्हणून फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील.तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र नि समस्त स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे ह्या महात्म्याचे जीवितकार्य होते. केशवपन सारख्या विकृत नि अमानवी रुढीविरुद्ध हा महात्मा उभा ठाकला नि त्यांनी विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.स्त्री नि अस्पृश्य ह्यांच्या शिक्षणाविरुद्ध शब्दही काढणे हे पाप मानले जात असतानाच्या...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साँग...

                                                             छाती ठोक हे सांगू जगाला छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही  कोणी झालाच हो कोणी झालाच  कोणी झालाच विद्वान मोठा  बुद्ध भगवान होणार नाही  छाती ठोक हे सांगू जगाला दिन दुबळ्यांची उडवूनी सुस्ती  चतुर्वरनाची जिरवूणी मस्ती कधी हरला ना हो कधी हरला ना  कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती  असा पहिलवान होणार नाही  छाती ठोक हे सांगू जगाला ज्याच्या घटनेवर चाले हे राज  ज्ञान वैभव हे त्यालाच साज  कुबेरालाही हो कुबेरालाही  कुबेरालाही वाटावी लाज  असा धनवान होणार नाही  छाती ठोक हे सांगू जगाला ओझं पाठीशी हे उपकाराच कस फिटणार त्या युगांधराच  हे रमेशा त्या हे रमेशा त्या  हे रमेशा त्या प्रभाकराच  कार्य गुणगान होणार नाही  छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही  कोणी झालाच विद्वान मोठा  बुद्ध भ...

मास्क वापरा. जीव वाचवा.

             COVID-19 चा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी: आपले हात वारंवार स्वच्छ करा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल-आधारित हॅंड रब वापरा. खोकला किंवा शिंक येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा. शारीरिक अंतर शक्य नसल्यास मास्क घाला. आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करु नका. आपण खोकल्यास किंवा शिंकत असल्यास आपले नाक आणि तोंड आपल्या दुमडलेल्या कोपराने किंवा टिश्यूने झाकून टाका. आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास घरी रहा. आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या.

बुद्ध थॉट...

  गौतम बुद्ध म्हणतात- आपण आज जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो.. आपल्या विचारातून आपलं भविष्य घडत असतं, हे तर सूर्य प्रकाशाइतकं स्वच्छ आहे त्यामुळे आपल्या विचारांचा मार्ग निवडता येणं, स्वतकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित करता येणं हे जीवनात अत्यंत महत्वाचं आहे..