मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजश्री छत्रपती शाहूमहाराज जयंती विशेष

                                          छ. शाहू महाराज (कोल्हापूर) : (२६ जून १८७४ –  ६ मे १९२२).  करवीर तथा कोल्हापूर   संस्थानचे थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण , जातिभेद-निवारण , अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाचे नाव यशवंतराव.                              बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र , अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत , हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या , विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.           ...

हॅपी फादर डे .

                               वडील आपले चिमुकले हाथ धरून जे  आपल्याला चालायला शिकवतात, ते बाबा असतात. आपण काही चांगले केल्यावर  जे अभिमानाने सगळ्याना सांगतात, ते बाबा असतात. माझ्या लेकराला काही कमी पडू नये या साठी जे घाम गाळतात, ते बाबा असतात. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात.. ते बाबा असतात. आपल्या लेकराच्या सुखा साठी जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात.                           धन्यवाद...                      

लेख क्र 2 योग दिन विशेष...

योग हा शब्द अत्यंत सहजपणे व चुकीच्या अर्थाने वापरला जातो. योग म्हणजे फक्‍त योगासने नाहीत. योग म्हणजे ध्यान नाही. योग म्हणजे हास्यक्‍लब मधील हसणे नाही. कृत्रिम रित्या केलेले संमोहन म्हणजेही योग नव्हे. योग म्हणजे नियमपालनही नाही. सध्या जे पेव फुटले ते म्हणजे योगाच्या प्रकारातील एकेक अंगाचे सादरीकरण व त्यालाच योग संबोधायचे. कुंडलिनी योगा , पॉवरयोगा असे परदेशातही प्रकार करतात. मुळात योग हाच योग्य शब्द आहे. योगा नव्हे. योग याचा अर्थ जोडणे. (युज धातू) आंग्लाळलेले. लोक योगाचा योगा हा चुकीचा उच्चार करतात व त्या आंग्लाळलेल्या चुकीची माहिती मर्यादित माहिती योग म्हणून इतरांना सांगतात. योग हा शब्द ' युज ' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे , ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे , ज्यात शरीर ताणले , वाकवले , पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची क...

राजमाता जिजाऊसाहेब स्मृतिदिन

              जिजामाता … जिजामाता … राजमाता जिजाबाई भोसले मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री .अशा अनेक नावानी आपण यांना ओळखतो. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत.                              सिंदखेडचे पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते. वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या. पुढे डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.                  पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्...

My thoughts

जर तुम्हाला तुमची  श्रीमंती मोजायची असेल  तर नोटा मोजू नका ! कधी चुकून  डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते   मोजा.

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

पर्यावरण दिन विशेष

    या भारत भुमीत देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. मोठ्या.  प्रमाणात क्रांती झाली.दुधगंगा घरोघरी पोहचण्यासाठी मोठी क्रांती झाली आणि आज आपल्या पुढे स्वप्न आहे हरीतक्रांतीचे ! का माझा देश हरितक्रांतीने नटला नव्हता ? भारताला प्राचीन काळापासून जे वैभव प्रात्प होते ते कोठे गेले.             “सुजलाम सफलाम सस्यशामला मातरम”                  अशी होती माझी धरणी. पण आज वेगळे वैविध्याने नटलेली पाचूच्या बेटासारखी.चित्रे माझ्या पुढे आहे.हिरवेगार असणारे डोंगर.आज ही धरती उजाड दिसत आहे.दूर दूर झाडे दीसत नाही.फार उन लागते.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात –हास झाला. हे कशामुळे झाले.जंगल भागातील मोठे मोठे भाग आपण आधीच कापून साफ केले.त्यातील लाकूड इमारत बांधण्यासाठी,लाकडी वस्तू तयार करण्यासाठी.इंधनासाठी , कागद निर्मिती करण्यासाठी, सुद्धा वापरले खरे.म्हणजे जंगल हे एका प्रकारचे कोठारच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. प्राणी,पशू ,सुक्ष्म जीव येथे आढळतात.आज हे सारे संपत चालले आहे.              ...

वटपौर्णिमा / vatporneemia

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सातही जन्म हाच पती मिळूदे तसेच पतीला दीर्घायुष्य लाभूदे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते.  पौराणिक कथेनुसार, भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहीत राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला...