मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मास्क वापरा. जीव वाचवा.

             COVID-19 चा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी: आपले हात वारंवार स्वच्छ करा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल-आधारित हॅंड रब वापरा. खोकला किंवा शिंक येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा. शारीरिक अंतर शक्य नसल्यास मास्क घाला. आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करु नका. आपण खोकल्यास किंवा शिंकत असल्यास आपले नाक आणि तोंड आपल्या दुमडलेल्या कोपराने किंवा टिश्यूने झाकून टाका. आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास घरी रहा. आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या.

बुद्ध थॉट...

  गौतम बुद्ध म्हणतात- आपण आज जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो.. आपल्या विचारातून आपलं भविष्य घडत असतं, हे तर सूर्य प्रकाशाइतकं स्वच्छ आहे त्यामुळे आपल्या विचारांचा मार्ग निवडता येणं, स्वतकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित करता येणं हे जीवनात अत्यंत महत्वाचं आहे..

साक्षरता दीन विशेष...

                  भारतात, राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर  जाते. वास्तवीक १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात झाली होती.                                                    पुर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होतं होती. मुख्यतः सावकारांकडुन. अश्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेउन त्यांच्याकडुन अंगठ्यांचे ठसे घेउन मोठ्याप्रमाणात जमीनी, आर्थीक मालमत्ता लाटण्यात आल्या. पुढे सरकारकडुन सावकारांवर बंधंन आली आणि अश्याप्रकारांना आळा बसला. असे असले तरी निरक्षरतेमुळे अश्या समाजाची वाढच खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक-मागणारे अनेक ...

शिक्षक दीन विशेष.....

                                                       डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो.  छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णनयांनी एके  ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.                वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अत्युच्च स्थान दिले आहे. गुरुला देवाच्या स्थानी मानले गेले आहे. जो देतो तो देव. गुरुंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची  अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची गुरु कडून असते. जे जे आपणासि ठावे |  ते  ते दुसर्यांस...