मुख्य सामग्रीवर वगळा

मुलगी वाचवा देश वाचवा !


              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे. 

 समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच्याविचारांना तेथे काडीची ही किंमत नसते हे चित्र फारच विदारक आहे. आपल्या देशातीलस्त्रियांची पुरूषांच्या तुलनेत घटती संख्या हा विषय म्ह्णा अथवा समस्या काहीमहिन्याच्या अंतराने ऐरणीवर येत असते. पण सरकारणे त्यावर काही ठोस उपाय योजल्याचेजाणवत नाही. आपल्या देशातील या संबंधीत यंत्रणा कुचकामी ठरल्यात असंच म्हणावं लागेल मुलाच्या हव्यासा पोटी काही लोक चार-पाच मुलींना जन्माला घालतात पण नंतरत्या त्यांच्यासाठी ओझ ठरतात त्यामुळे ते त्यांच्या तब्बेतीकडे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणाम स्वरूप कळ्या फुलण्या अगोदर कोमेजून नष्ट होतात. आतायापुढे देशात जन्माला येणार्या प्रत्येक मुलीची काळजी सरकारणे घ्यायला हवी. बदलतचाललेली सामाजिक परिस्थिती ही अगदी सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांनाही मुलगी नको याविचारापर्यत पोहचायला प्रवृत्त करते. 


                    आपल्या देशात धर्म आणि संस्कृतीचा चुकीचाअर्थ काही अज्ञानी लोक लावत असतात त्यामुळे ही मुलींची संख्या घटताना दिसते. मुालगाहवा या हट्टापायी जर काही लोक चार-पाच मुलींना जन्म देत असतील तर ते देशाच्याहिताचेच आहे त्यामुळे जन्माला येणार्या सर्वच मुलींची जबाबदारी सरकारणे घ्यायलाहवी. हे झाले मध्यमवर्गीय माणसांच्या बाबतीत पण श्रीमंत वार्गाला एकच आपत्य हवेअसते ते आपत्य ही मुलगा असावा अशी काहींची इच्छा असते. यातूनच त्यांच्याकडूनमुलींचा गर्भात असतानाच जीव घेण्याचे प्रकार घडतात. मुलगा आपली म्हातारपणी काळजीघेईल या खोट्या आशेवर जगत असणारे मुलाचा अट्ट्हास करीत असतात. सर्वच जेष्टनागरिकांची काळजी जर सरकारणे उचलायची ठरवली तर यात बदल करता येईल. देशातील मुलींचीमुलांच्या तुलनेत घटती संख्या वाढेल पण त्यासाठी मुलींच्या जन्माला अवरोध करणार्याप्रत्येक घटकांचा मुलापासून सर्वनाश करावा लागेल. मुलगी वाचली तरच देश घडेल. हेकरण्यासाठी देशातील सरकार सह या संबंधित सर्वच यंत्रणांनी कसून प्रयत्न करायलाहवेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...