यश म्हणजे काय ?
तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटेल पण पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशिष्ट शक्ती असतेच . मी येथे ' प्रत्येक व्यक्ती ' असा उल्लेख केला आहे , का बरं ? कारण तुम्ही याला अपवाद आहात , असा तुमचा गैरसमज होऊ , नये म्हणुन या विधानात तुम्ही सुद्धा समाविष्ट आहात .
तुमच्या मध्ये असणार्या शक्तीचे दुसरे एक वैशिट्ये आहे , ते म्हणजे तुमच्याजवळ जी शक्ती किंवा कौशल्य आहे , त्या प्रकारचे कौशल्य दुसर्या व्यक्तींजवळ असू शकते . परंतु त्यात संपूर्णतः साम्य असू शकत नाही. म्हणजे बाह्यतः सारख्या वाटणार्या कौशल्यातही वेगळेपणा आढळून येतो .
आठ दहा मराठी लेखक विनोदी लेख लिहीत असतील , तेंव्हा विनोदी लेखन हे त्यांच्यातील साम्य आहे .पण प्रत्येकाची लेखन शैली , विनोदी साहित्यविषयीचा अभ्यास , वेगवेगळा असू शकतो . कोणा दोघांच्याही लिखाणात तुम्हांला संपूर्ण साम्य दिसून येणार नाही . यावरून काय दिसते ? प्रत्येकाचे स्वतः चे कौशल्य हे त्याचे स्वतः चेच असते व ते विशिष्ठ असते .
या सत्याची कल्पना बहुतेक लोकांना असतं नाही . स्वतः मध्ये एक सुप्त शक्ती आहे , हेच त्याच्या लक्षात येत नाही , त्यामुळे तिचा योग्य विकास करणे , तिचा योग्य वापर करणे , याचे ज्ञान कोठून असणार ? आपण सर्वजण आपल्याजवळ असणार्या शक्तीपैकी अल्पशक्तीचा वापर करतो आणि त्यावर संतुष्ट राहतो . त्यामुळे त्या शक्तीचा विकास करावा हे लक्षातच येत नाही .
म्हणूनच एका पंडिताने म्हणटले आहे , ' प्रत्येक मनुष्य ' स्वतः जवळ असणार्या नैसर्गिक शक्तीपैकी फक्त दहा टक्के शक्तीचाच उपयोग करतो . व बाकीची नव्वद टक्के शक्ती वाया घालवतो .
पंडितांच्या या विधानाला अनुसरून यशाचा अर्थ आपण शोधूया . स्वतः मध्ये असणार्या शक्तीचा पूर्णपणे उपयोग करणे याचे नाव यश .
तुच्याजवळ कोणतीही कलाशक्ती असू शकते मग ती चित्रकला असेल , संगीत असेल , कदाचित तुम्ही गोष्टी लिहू शकत असाल , किंवा छाप काम करत असाल म्हणजे ती कोणतीही कला तुम्हाला अवगत असेल त्या कलेचा पूर्ण विकास केला कि तुम्ही यशस्वी झाला , असे समजले जाते.
तुम्ही अनेक यशस्वी लोकांना लांबून पाहिलं असेल तेंव्हा तुमच्या आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला खूप मोठे अंतर असल्यासारखे वाटत असेल . ते पाहून कदाचित तुम्ही हताश झाला असाल . तुम्हाला वाटले असेल हे एवढे अंतर मी केंव्हा कापू शकेन ? या हताश विचाराने तुम्ही पुढे जायलाही घाबरला असाल किंवा आताच्या परिस्थितीचा हताशपणे विचार करत बसत असाल , तेंव्हा एक सत्य गोष्ट लक्षात ठेवा . तुमच्या आताच्या व सुरुवातीच्या परिस्थितीचा फारसा फरक नसेल .
तुम्ही आज जी संकटे व अडचणी भोगत आहात ? तीच सुरुवातीसहि भोगली आहेत . बहुतेकांच्या जीवनात असेच घडत असते . त्याला तुम्ही अपवाद नाही . अर्थात कित्येकजण यशस्वी होतात . यशस्वी झालेले दिसतात त्याचे कारण आहे , स्वतः च्या अडचणींवर मात करण्याची मानसिक तयारी . स्वतः कठीण परिस्थिसमोर मान न झुकवण्याचा तडफदारपणा . ते स्वतः च्या संकटाकडे एका वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात तर इतर अगदीच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात .
यशस्वी माणसे व्यवहारी शहाणपणाने आपल्या अडचणीतून मार्ग काढतात . वास्तव दृष्टिकोन ठेवुन आपली समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि तेच तर त्याच्या यशाचे गमक आहे . इतर लोक अर्धा व पाव रस्त्यापर्यंत जाता जाताच थकतात . दमून जातात . या उलट यशस्वी लोक किनार्यापर्यंत पोहचण्याची हिंमत बाळगून असतात. आणि हेच मनोबल त्यांना साथ देते .
म्हूणन चला तर मग पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि न थकता कामाला लागा व यशस्वी बना .
धन्यवाद ......
तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटेल पण पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशिष्ट शक्ती असतेच . मी येथे ' प्रत्येक व्यक्ती ' असा उल्लेख केला आहे , का बरं ? कारण तुम्ही याला अपवाद आहात , असा तुमचा गैरसमज होऊ , नये म्हणुन या विधानात तुम्ही सुद्धा समाविष्ट आहात .
तुमच्या मध्ये असणार्या शक्तीचे दुसरे एक वैशिट्ये आहे , ते म्हणजे तुमच्याजवळ जी शक्ती किंवा कौशल्य आहे , त्या प्रकारचे कौशल्य दुसर्या व्यक्तींजवळ असू शकते . परंतु त्यात संपूर्णतः साम्य असू शकत नाही. म्हणजे बाह्यतः सारख्या वाटणार्या कौशल्यातही वेगळेपणा आढळून येतो .
आठ दहा मराठी लेखक विनोदी लेख लिहीत असतील , तेंव्हा विनोदी लेखन हे त्यांच्यातील साम्य आहे .पण प्रत्येकाची लेखन शैली , विनोदी साहित्यविषयीचा अभ्यास , वेगवेगळा असू शकतो . कोणा दोघांच्याही लिखाणात तुम्हांला संपूर्ण साम्य दिसून येणार नाही . यावरून काय दिसते ? प्रत्येकाचे स्वतः चे कौशल्य हे त्याचे स्वतः चेच असते व ते विशिष्ठ असते .
या सत्याची कल्पना बहुतेक लोकांना असतं नाही . स्वतः मध्ये एक सुप्त शक्ती आहे , हेच त्याच्या लक्षात येत नाही , त्यामुळे तिचा योग्य विकास करणे , तिचा योग्य वापर करणे , याचे ज्ञान कोठून असणार ? आपण सर्वजण आपल्याजवळ असणार्या शक्तीपैकी अल्पशक्तीचा वापर करतो आणि त्यावर संतुष्ट राहतो . त्यामुळे त्या शक्तीचा विकास करावा हे लक्षातच येत नाही .
म्हणूनच एका पंडिताने म्हणटले आहे , ' प्रत्येक मनुष्य ' स्वतः जवळ असणार्या नैसर्गिक शक्तीपैकी फक्त दहा टक्के शक्तीचाच उपयोग करतो . व बाकीची नव्वद टक्के शक्ती वाया घालवतो .
पंडितांच्या या विधानाला अनुसरून यशाचा अर्थ आपण शोधूया . स्वतः मध्ये असणार्या शक्तीचा पूर्णपणे उपयोग करणे याचे नाव यश .
तुच्याजवळ कोणतीही कलाशक्ती असू शकते मग ती चित्रकला असेल , संगीत असेल , कदाचित तुम्ही गोष्टी लिहू शकत असाल , किंवा छाप काम करत असाल म्हणजे ती कोणतीही कला तुम्हाला अवगत असेल त्या कलेचा पूर्ण विकास केला कि तुम्ही यशस्वी झाला , असे समजले जाते.
तुम्ही आज जी संकटे व अडचणी भोगत आहात ? तीच सुरुवातीसहि भोगली आहेत . बहुतेकांच्या जीवनात असेच घडत असते . त्याला तुम्ही अपवाद नाही . अर्थात कित्येकजण यशस्वी होतात . यशस्वी झालेले दिसतात त्याचे कारण आहे , स्वतः च्या अडचणींवर मात करण्याची मानसिक तयारी . स्वतः कठीण परिस्थिसमोर मान न झुकवण्याचा तडफदारपणा . ते स्वतः च्या संकटाकडे एका वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात तर इतर अगदीच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात .
यशस्वी माणसे व्यवहारी शहाणपणाने आपल्या अडचणीतून मार्ग काढतात . वास्तव दृष्टिकोन ठेवुन आपली समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि तेच तर त्याच्या यशाचे गमक आहे . इतर लोक अर्धा व पाव रस्त्यापर्यंत जाता जाताच थकतात . दमून जातात . या उलट यशस्वी लोक किनार्यापर्यंत पोहचण्याची हिंमत बाळगून असतात. आणि हेच मनोबल त्यांना साथ देते .
म्हूणन चला तर मग पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि न थकता कामाला लागा व यशस्वी बना .
धन्यवाद ......


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा